स्व. विखे यांनी दुष्काळमुक्त जिल्ह्यासाठी प्रयत्न केले : ना. विखे

0
Swa. Balasaheb Vikhe Patil

स्व. विखे यांनी दुष्काळमुक्त जिल्ह्यासाठी प्रयत्न केले : ना. विखे

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सातत्याने संघर्ष केला. महाराष्ट्र पाणी परिषेदेच्या माध्यमातून त्यांनी पाणी प्रश्नाबाबत केलेल्या सुचनांचे शासनाकडून धोरणात रुपांतर होणे, हेच त्यांच्या प्रयत्नांचे यश ठरले असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शेती, सहकार, शिक्षण, पाणी आणि ग्रामीण विकासाचे प्रनेते लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या यांच्या ९२ व्या जयंती दिनाचे औचित्य साधुन प्रवरा परिवाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी खा. डॉ, सुजय विखे, जेष्ठ नेते वंसतराव कापरे, भाजपा नेते विनायकराव देशमुख आदी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण विकासाचे धोरण ठेवण्यासाठी प्रत्येक सरकारमध्ये अभ्यास मंडळाच्या माध्यमातून सुचना केल्या. पाणी प्रश्नासाठी ते नेहमीच संवेदनशील राहीले. जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करताना नवीन पाणी योजना निर्माण करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र पाणी परिषेदेच्या माध्यमातून तयार केलेले प्रयत्न शासनाने स्विकारले. पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी तुटीच्या खोऱ्यात वळवून जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले, असेही विखे यावेळी म्हणाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.