खते, बियाण्यांचे लिंकींग करणाऱ्या विक्रेते, कंपन्यावर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

0
eaknath shinde - kharip adhava baithak

खते, बियाण्यांचे लिंकींग करणाऱ्या विक्रेते, कंपन्यावर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

Eknath Shinde – राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप दि. ३० जूनपर्यंत पूर्ण करावे, शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी, खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यावरही कडक कारवाई करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी विभाग आणि इतर अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत राज्यातील खरीप आढावा बैठक श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी यांनी या सूचना केल्या आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, पणन मंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. राज्य शासन शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगतानाच बांबु लागवड क्षेत्राची वाढ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठांनी नवीन संशोधनावर भर द्यावा, तसेच ज्या भागात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे असे तालुके,जिल्ह्यांवर विशेष लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना देखील मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. त्यामुळे कारिपामध्ये शेतकऱ्यांना कोणत्याच अडचणी येणार नाहीत याची दक्षता सरकारकडून घेतली जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.