विकासकामांसोबत तुमच्यासोबत मी खंबीरपणे उभा : डॉ. सुजय विखे

0
Sujay Vikhe Sabha

... तर महायुतीच्या कार्यकर्त्यानी बांगड्या भरलेल्या नाहीत निवडणुकीत पराभव का झाला याची कारण फार वेगळी आहेत. पण तरीही सहा लाखांचे मतदान देवून जनतेन आपल्यावर विश्वास दाखवला आहे. यासाठी जे कार्यकर्ते पळाले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्ही पराभव स्विकारला पण समोरच्यांना विजय पचवता येत नाही. पारनेरची घटना पाहाता आता यापुढे कोणाही कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यास महायुतीच्या कार्यकर्त्यानी बांगड्या भरलेल्या नाहीत, आशा शब्दात माजी खा. सुजय विखे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

अहमदनगर (प्रतिनिधी) – माझ्या विजयासाठी प्रत्येक कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून पळाला आहे. पराभव झाला असला तरी खचून जाऊ नका. आरोप प्रत्योरोपांमध्ये वेळ घालविण्यापेक्षा गावपातळीवर आजपासून कामाला सुरूवात करा. जिथे अन्याय होईल तिथे तुमच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा आहे. महायुतीची ताकद विधानसभा निवडणुकीत दाखवून देण्यासाठी कटीबध्द व्हा, असा संदेश माजी खा. डाॅ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना,पदाधिकाऱ्यांना दिला.

निवडणूक निकालानंतर डाॅ. सुजय विखे पाटील यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकरी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी यावेळी उपस्थित होते.

… तर महायुतीच्या कार्यकर्त्यानी बांगड्या भरलेल्या नाहीत
निवडणुकीत पराभव का झाला याची कारण फार वेगळी आहेत. पण तरीही सहा लाखांचे मतदान देवून जनतेन आपल्यावर विश्वास दाखवला आहे. यासाठी जे कार्यकर्ते पळाले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्ही पराभव स्विकारला पण समोरच्यांना विजय पचवता येत नाही. पारनेरची घटना पाहाता आता यापुढे कोणाही कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यास महायुतीच्या कार्यकर्त्यानी बांगड्या भरलेल्या नाहीत, आशा शब्दात माजी खा. सुजय विखे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावात आपण निधी दिला आहे.विकास काम पूर्ण कशी होतील याचा पाठपुरावा करा यासाठी थेट संपर्क साधा.केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे.विकास कामांना मोठी मदत होणार आहे.नगरच्या औद्योगिक वसाहतीचे काम महीनाभरात सुरू होईल जी आश्वासन दिली त्याची पूर्तता करण्यासाठी आपण कटीबध्द राहणार असून कुठेही कमी पडणार नाही. कोणी काही चर्चा केल्यातरी २०२९ चा खासदार महायुतीचाच असेल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची ताकद विरोधकांना दाखवून देण्याचे आवाहन डाॅ. विखे पाटील यांनी केले.

जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी आपल्या भाषणात डॉ विखे यांच्या पराभवाची कारण खूप वेगळी आहे. त्याचे विश्लेषण समोर आले आहे. काही गोष्टीचा खोटा प्रचार करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. पराभवाचे दुख असले तरी नाउमेद न होता सर्वानी एकसंघपणे पुन्हा कार्यरत राहाण्याचे आवाहन त्यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.