डाळींचे उत्पादयासाठी शेतकऱ्यांना केंद्राने डीबीटीद्वारे अनुदान देण्याची मागणी

डाळींचे उत्पादयासाठी शेतकऱ्यांना केंद्राने डीबीटीद्वारे अनुदान देण्याची मागणी
दिल्ली – देशात डाळींच्या उत्पादनात 100% आर्मनिर्भरता मिळवण्यासाठी केंदीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, गुजरात, कर्नाटक, झारखंड, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांच्या कृषिमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित परिषद दुरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली.
दरम्यान या परिषदेत महाराष्ट्राची बाजू मांडताना, महाराष्ट्र राज्य हे कडधान्य उत्पादनात देशात आघाडीवर असल्याचे नमूद केले. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या धोरणानुसार या उत्पादनात आणखी वाढ करण्यासाठी कृषी विद्यापीठे, संशोधन, प्रगत शेती, सुधारित वाणांचा वापर, पाणी व खत वापराचे सुयोग्य नियोजन आदी माध्यमातून नियोजन केले जाईल, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
यावेळी कडधान्यांचा उत्पादन खर्च आणि एमएसपी यांच्यातील दराची तफावत कमी करण्यासाठी आणि डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने डीबीटीद्वारे कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत मागणी देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.