vijay kadam

vijay kadam : अभिनेते विजय कदम यांचे निधन !

vijay kadam – मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम (vijay kadam) यांचे आज दि. १० ऑगस्ट रोजी पहाटे निधन झाले. विजय कदम 1980 आणि 90 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय अष्टपैलू अभिनेते होते. त्यांनी गंभीर तसेच विनोदी भूमिकाही केल्या. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. अभिनेते विजय कदम (vijay kadam) गेल्या दीड वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांचे निधन झाले, यांच्या पार्थिवावर अंधेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

अभिनेते विजय कदम यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला थिएटरमधून सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम केले. ‘विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्या’, ‘खुमखुमी’ हे कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. 1986 पासून आतापर्यंत विजय कदम यांनी 750 हून जास्त प्रयोग केले. विजय कदम यांनी अनेक वर्षे त्यांच्या ‘विजयश्री’ या संस्थेकडून ‘खुमखुमी’हा एकपात्री प्रयोग केला. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये विजय कदम घराघरात पोहोचले.

राजानं वाजवला बाजा, आनंदी आनंद, इरसाल कार्टी, लावू का लाथ, गोळाबेरीज, ऑन ड्युटी २४ तास, वासुदेव बळवंत फडके, रेवती, देखणी बायको नाम्याची, मेनका उर्वशी, कोकणस्थ आदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. सही रे सही, टुरटूर, पप्पा सांगा कुणाचे ही देखील त्यांनी गाजलेली नाटके आहेत. त्यांचे ‘चश्में बहादूर’, ‘पोलिसलाइन’, ‘हळदे रुसली कुंकू हसलं’ आणि ‘आम्ही दोघं राजा राणी’ हे चित्रपट खूप गाजले. त्यांना अष्टपैलू प्रतिभेचा अभिनेता म्हणून आज मराठी चित्रपट सृष्टीत ओळखले जाते. दरम्यान चित्रपट सृष्टीतील, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेकांनी शोक व्यक्त केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.